मुख्य सामग्रीवर वगळा

पर्यावरण संवर्धन काळाची गरज


पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण
---------------------------------------------
आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय म्हणजे पर्यावरण .  पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाचा आणि आपला काय संबंध आहे ? पर्यावरणाचे रक्षण ,संवर्धन व प्रदूषण निवारण का करायचे ? याबाबत आपण कधी विचार करून योग्य ती कार्यवाही केली का ?आपण पर्यावरणाकडे गांभीर्याने लक्ष देतो का ? पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण केले नाही तर काय होईल ? या सर्व बाबी आपणाला माहीत असल्या पाहिजेत.त्यासाठी पर्यावरण म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे. पर्यावरण हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, वाचतो , पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर पर्यावरणावर आधारित अनेक पुस्तके आपल्याला पहायला मिळतात, पर्यावरण म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ या कारण ही बाब खूप महत्त्वाची आहे .आपल्या सभोवती असणाऱ्या जैविक व अजैविक घटकांना पर्यावरण असे म्हणतात . थोडक्यात पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असणारे सर्व सजीव व निर्जीव घटक .अशी साधी सरळ पर्यावरणाची व्याख्या आपल्याला करता येते. पर्यावरणात  प्राणी ,वनस्पती , हवा, पाणी ,अन्न , नद्या ,नाले ,ओढे , डोंगर ,पर्वत  , झाडे ,वेली ,जमीन ,सागर, पशुपक्षी , प्राणी  आणि इतर सर्व सजीवांचा  व निर्जिवांचा समावेश होतो. पर्यावरणाच्या साखळीत सजीव आणि निर्जीव यांचा आपल्याला उपयोग होत असतो.हवा, पाणी , अन्न  आपल्या मूलभूत गरजा आहेत.आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातून म्हणजे  आपल्या या मूलभूत गरजा पूर्ण होतात. म्हणून परिसराची आपण जपणूक केली पाहिजे .औद्योगीकरण आणि वृक्षतोड यामुळे हवामान बदल झाला. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा प्रचंड प्रमाणात वापर यामुळे जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे. कारखान्यातील दूषित वायू , वाहनांचा धूर ,फटाके वाजवणे यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे .हवेचे प्रदूषण झाल्यामुळे वेगवेगळे आजार  होत आहेत. दूषित पाणी  व  कचरा ओढ्याच्या ,नदीच्या   पाण्यात सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे मानवास अनेक जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. पाण्याच्या प्रदूषणामुळे आपण विविध आजारांना बळी पडत आहोत .नदी डोंगरात उगम पावते तेथे तिचे पाणी किती स्वच्छ असते परंतु ज्यावेळी ती मानवी वस्तीजवळ येते त्यावेळी तिचे पाणी दूषित होते .हे आपण पाहिले असेल.हे पाणी  मानवाने दूषित  केले त्यामुळे त्याचे दुष्परिणाम मानवासह सर्व सजीवांना भोगावे लागत आहे.  रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नाचे प्रदूषण होते.हे आपल्या आरोग्यास घातक आहे.
 म्हणून  आपण सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे . आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही एक जागतिक समस्या आहे. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास आपण  कारणीभूत आहोत .आपण आपला विकास केला परंतु या विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी  जेवढी कार्यवाही करणे गरजेचे होते  तेवढी कार्यवाही , उपाययोजना  केली का विचार आपण केला पाहिजे .झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मिळतो .या ऑक्सिजनची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते परंतु झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देतात त्यांचे महत्व आपणास समजले पाहिजे.तसेच झाडांमुळे हवेचे प्रदूषण थांबते. मानवाच्या काही  अयोग्य गोष्टीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.आपण आपल्या पातळीवर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण पर्यावरणाचे संवर्धन वेळीच केले नाही तर आपल्याला आणि सर्व सजीवांना जगणे कठीण होईल.पर्यावरणाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा . म्हणून पर्यावरणाची समस्या समजावून घेऊन त्यावर आपण सर्वांनी उपाय योजना करणे अतिशय  आवश्यक आहे . आपली सर्वात महत्वाची गरज म्हणजे हवा .हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करणे गरजेचे आहे.  आपली दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे पाणी . पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो. दूषित पाण्यातून अनेक आजार होतात .पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी कचरा ओढ्यात ,नदीत न टाकता कचराकुंडीत टाकला पाहिजे .दूषित पाणी ओढ्यात ,नदीत न सोडता शोषखड्ड्यात सोडले पाहिजे .शोषखड्ड्याजवळ झाड लावले पाहिजे.अन्न प्रदूषण रोखण्यासाठी सेंद्रिय शेती केली पाहिजे.
 आमची शाळा ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डोंगराळ भागातील  गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम नेहमी राबविला जातो .शाळेत विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले.या उपक्रमात विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा कृतिशील सहभाग घेतला. हा उपक्रम शाळा व गावपातळीवर राबविला. विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत कृतिशील मार्गदर्शन करून जनजागृती केली.त्यामुळे त्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत महत्व समजले. शाळेतील रोपवाटिकेतून वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना विविध झाडांची रोपे वाटप केली.तसेच राज्याचे तत्कालीन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते  विद्यार्थी  व ग्रामस्थ यांना शाळेच्या वतीने  विविध झाडांची रोपे वाटण्यात आली. त्यांनी घराजवळ आणि शेताच्या कडेला प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले आहे. दरवर्षी विद्यार्थी  व ग्रामस्थ  वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात .त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे. विद्यार्थ्यांचे वाढदिवस झाडाचे रोप भेट देऊन साजरे केले जातात.देशाची रक्षा करणारे आजी माजी सैनिकांचे वाढदिवस झाडांची रोपे भेट देऊन साजरे केले जातात. कोरोनाकाळात आपणा सर्वांना ऑक्सिजनचे महत्व समजले आहे.कोरोनाकाळात वृक्षारोपणासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन विविध रोपे वाटप  केली.सर्वांनी  वृक्षारोपन करून त्यांचे संगोपन केले.  बियांपासून घरच्या घरी  रोपे कशी  तयार  करायची  याबाबत विद्यार्थ्यांना कृतिशील मार्गदर्शन केले.त्यानुसार विद्यार्थी घरच्याघरी विविध बियांचा संग्रह करून रोपे तयार करतात.विद्यार्थ्यांनी तयार केलेली रोपे  शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिली जातात.  हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी  विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात. विद्यार्थी पाण्यामध्ये कचरा टाकत नाहीत. पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत.शाळेत कचऱ्यापासून सेंद्रिय खत  तयार केले जाते.
शाळेत कुंडीतील रोपांची लागवड केली. जनहिताचे  विविध संदेश पाट्या तयार करून शालेय परिसरात दर्शनीय भागावर लावले आहेत.
शाळेत कायम सेंद्रीय परसबाग  प्रकल्प राबविला जातो.यामधून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले जातात.ते पाहून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक सेंद्रिय शेती करू लागले आहेत . त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करतात.आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय ,राज्यस्तरीय ,जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धनबाबत ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थी आनंदाने  सहभागी होतात.अशा प्रकारे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.
या उपक्रमामुळे शाळेत शिक्षणाला पूरक असे आनंददायी व निसर्गरम्य वातावरण तयार केले.त्यामुळे शाळा सुटली तरी विद्यार्थ्यांना घरी जाऊ वाटत नाही.
 तसेच राज्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविण्यासाठी राज्यातील शिक्षकांना कृतिशील मार्गदर्शन करण्यासाठी सन २०१६ पासून आम्ही दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून मार्गदर्शन करतो.त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर प्रदूषणमुक्त भारत निर्माण होण्यास मदत होईल.
   चला तर मग आपल्याला ,आपल्या भावी पिढीला आणि इतर सर्व सजीवांना  आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी आपणही सर्वजण पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण या सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्यात कृतिशील सहभाग घेऊ या.

लेखक 
तुकाराम तुळशिराम अडसूळ 
   प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
 ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏