पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणारी गितेवाडी शाळा
तुकाराम तुळशिराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता .पाथर्डी जि. अहमदनगर
मो ७५८८१६८९४८
पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे ,पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही एक फार मोठी जागतिक समस्या निर्माण झाली आहे ,
आपली लोकसंख्या वाढली .त्याबरोबर लोकांच्या गरजा वाढल्या .या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाने विविध यंत्रांचा ,तंत्रज्ञानाचा शोध लावला .या नादात पर्यावरण संवर्धन जेवढे होणे अपेक्षित होते तेवढे झाले नाही तसेच विविध प्रकारचे प्रदूषण वाढले ,हे प्रदूषण थांबविण्यासाठी माणसाने जेवढे प्रयत्न करणे गरजेचे होते तेवढे झाले नाही .प्रदूषण वाढत चालले आहे .हवा ,पाणी ,अन्न या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत .त्यांचे प्रदूषण वाढत आहे .त्यामुळे सजीवांच्या जगण्यासाठी बाधा निर्माण होत आहे ..म्हणून प्रदूषण थांबविणे ही काळाची गरज आहे .पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .या पृथ्वीवर मानवासह सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे .सर्व सजीवांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी ,प्रदूषणमुक्त अन्न मिळाले .परंतु आज हवा ,पानी ,अन्न यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे विविध प्रकारचे आजार माणसांना व इतर प्राण्यांना होत आहेत .हे प्रदूषण जर आपण वेळीच थांबविले नाही तर माणसांच्या जीवितास माणसेच जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .
म्हणून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण टाळण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण केले आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये तसेच अनेक ग्रामस्थांमध्ये रुजविले आहे . गावातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण केले आहे.यासाठी आम्ही आमच्या शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत .
प्रदूषणमुक्त सण समारंभ -- हवा ही सर्व सजीवांची सर्वात महत्वाची मूलभूत गरज आहे .
हवेचे प्रदूषण कारखान्यातील धूर ,फटाके मधील धूर ,विविध वाहनांचा धूर यामुळे होते .म्हणून हवेचे प्रदूषण थांविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्त्व पटवून दिले .आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू श्वसनासाठी आवश्यक असतो .प्रदूषणामुळे हवेतील प्राणवायू कमी होऊन कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढत आहे .त्यामुळे हवेचे तापमान वाढत आहे म्हणजे उष्णता वाढत आहे .यामुळे मानवाला ,प्राण्यांना
खूप त्रास होत आहे.तसेच श्वसनाचे विविध विकार होत आहेत .हवेचे प्रदूषण थांविण्यासाठी विद्यार्थी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतात ,ग्रामस्थांनाही वेळोवेळी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्व पटवून दिले आहे .ग्रामस्थही प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .
१) वृक्षारोपण -- झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते.झाडांमुळे हवेचे प्रदूषण थांबते . आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्याचे महत्वाचे कार्य झाड करत असते .
या ऑक्सिजनची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर ज्यावेळी ऑक्सिजन लावला जातो त्यावेळी समजते. म्हणून झाडे लावण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .शाळेत विविध प्रकारची प्रचंड झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे .
शाळेतील परिसर निसर्गरम्य केला आहे .
शाळेतील विद्यार्थ्यांना पाच ते वीस झाडांची रोपे वाटप केली ,माध्यमिक शाळेतील विद्यार्थी ,ग्रामस्थ यांना शाळेच्या वतीने प्रत्येक कुटुंबास पाच झाडांची रोपे वाटली .ही सर्व रोपे विद्यार्थ्यांनी शेताच्या व घराच्या परिसराजळ लावून त्यांचे संगोपन केले आहे .शाळेत वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमात सर्वांना वृक्षारोपणासाठी झाडाचे रोप भेट देण्यात येते .तसेच विद्यार्थ्यांचे व आजी माजी सैनिकांचे वाढदिवस शाळेत झाडाचे रोप देऊन साजरे केले जातात .दरवर्षी वृक्षारोपणासाठी सुमारे दोन हजार झाडांची रोपे शाळेमार्फत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वाटली जातात . म्हणून हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी वृक्षारोपणाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .
२) पाणी प्रदूषण --हवेनंतर पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे . नदीच्या ,ओढ्याच्या पाण्यात दूषित पाणी सोडणे , कचरा टाकणे ,सांडपाणी सोडणे ,कपडे धुणे ,जनावरे धुणे ,गाड्या धुणे ,भांडी धुणे यामुळे पाणी प्रदूषण होते .हे प्रदूषण शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पावसाळ्यात नदीवर ,ओढयावर नेऊन दाखवून माहीती दिली . हे दूषित पाणी आपण पितो त्यामुळे कावीळ ,कॉलरा यासारखे आजार आपल्याला होतात हे त्यांना समजावून दिले . विद्यार्थी शाळेत पाणी पिताना ओगराळ्याने घेतात .पिण्याच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ केली जाते .
प्रदूषण थांबविण्यासाठी आपण या बाबी टाळल्या पाहिजेत हे त्यांना समजावून दिले .त्यांना ते पटले .विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती केली.सांडपाण्याची साठी पालकांनी घराजवळ शोषखड्डे घेतले आहेत व त्या शोषखड्डयाजवळ वृक्षारोपण केले आहे .त्यामुळे ते ओढयाचे नदीचे व इतर ठिकानावरील पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाही .
३) प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या -- प्लॅस्टिक च्या पिशवीमुळे प्रदूषण होते .प्लॅस्टिक च्या पिशव्यामुळे व प्लॅस्टिक मुळे जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जनावरे मरतात. गावातील सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा केले . प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशव्या ,कागदी पिशव्यांचा वापर ,प्लॅस्टिक च्या विविध वस्तू वापर न करणे विषयी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली .शाळेत कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याची कार्यशाळा घेतली ,शाळेतील सर्व विद्यार्थी कागदी व कापडी पिशव्या बनवतात .या पिशव्या बाल आनंद मेळाव्यात व गणित विज्ञान प्रदर्शनात मांडून प्रदूषण थांबविण्यासाठी जनजागृती केली .विद्यार्थी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक च्या विविध वस्तू वापरत नाही .
४) अन्न प्रदूषण --हवा ,पाणी नंतर सजीवांची अन्न ही मूलभूत गरज आहे .सर्व सजीवांना प्रदूषणमुक्त अन्न मिळाले पाहिजे .तसेच अन्न खाल्ल्यानंतर उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .अन्न इकडे तिकडे कोठेही टाकू नये .शाळेतील विद्यार्थी उरलेले अन्न पशु पक्षांना देतात . उरलेल्या अन्नासाठी तशी स्वतंत्र व्यवस्था शाळेत केली आहे . तसेच विद्यार्थी जेवताना ताटात शक्यतो अन्न शिल्लक ठेवत नाही . पिकांवर ,भाजीपाल्यांवर कीटकनाशके फवारणी केली जाते ,रासायनिक खते वापरली जातात त्यामुळे अन्नाचे प्रदूषण होऊन माणसे व जनावरे यांना विविध आजार होतात .हे प्रत्यक्ष शेतातील पिकांना क्षेत्रभेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली .विद्यार्थ्यांना हे समजले.अन्नाचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे .सेंद्रिय शेतीला सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे .हे शाळेत परसबाग तयार करून दाखवून दिले .त्यामध्ये सेंद्रिय भाजीपाला केला ,तो भाजीपाला वेळोवेळी शाळेतील शालेय पोषण आहार मध्ये वापरला जातो .
तसेच शाळेत दरवर्षी सेंद्रिय भाजीपाला बाजार भरवला जातो .गावातील सर्व लोक या बाजाराला भेट देतात व भाजीपाला खरेदी करतात .यावेळी त्यांच्यामध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जाते ,त्यांनाही सेंद्रिय शेतीचा महत्व समजले आहे .
५) कचरा व्यवस्थापन --कचऱ्यामुळे खूप मोठे प्रदूषण होते .म्हणून कचरा कशामुळे होतो .कचऱ्यात कोणकोणत्या बाबी असतात .याबाबत विद्यार्थ्यांना शोध घेण्यास सांगितले . ओला कचरा व सुका कचऱ्या बाबत माहिती देऊन हा कचरा दोन कचरा कुंडीत वेगळा ठेवला जातो . तसेच कचऱ्यापासून खत तयार केले जाते व झाडांना दिले जाते .विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत तसेच कचरा होऊ नये म्हणून ते वही,पुस्तक यांची पाने फाडत नाहीत .
६) ध्वनी प्रदूषण -- डिजेचा
आवाज ,हॉर्न वाजवणे ,घरातील टी .व्ही .,टेप चा आवाज ,फटाक्यांचा आवाज जर मोठा असेल तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते.शाळेत विद्यार्थी व ग्रामस्थ यांना वेळोवेळी ध्वनी प्रदूषण बाबत माहिती देऊन जनजागृती केली .कारण या प्रदूषणामुळे बहिरेपणा येतो ,कानांना त्रास होतो ,ज्यांना ह्रदयविकार आहे त्यांनाही त्रास होतो.विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना या प्रदूषणाचे दुष्परिणाम समजले ते गावात डी .जे .वाजवत नाहीत व आवाजाचे प्रदूषण होऊ देत नाही .
७) भूमी प्रदूषण --जमिनीवर विविध प्रकारचा कचरा टाकल्यामुळे भूमी प्रदूषण होते .रासानिक खते व कीटकनाशके फवारणी करताना जमिनीवर ही औषधे पडून जमिनीचे प्रदूषण होते .हे परिसर भेटीतून विद्यार्थ्यांना समजावून दिले .हे प्रदूषण थांबविण्यासाठी सेंद्रिय खते वापरण्याचे महत्व सांगुन जनजागृती केली .
अशाप्रकारे पर्यावरण संवर्धन प्रदूषण टाळण्यासाठी व रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणाचे मूल्य रुजविले .
८ ) पर्यावरण कार्यशाळा -- इतर अनेक शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यांविषयी मार्गदर्शन करून जनजागृती करत आहे .
९) पर्यावरण संमेलन -- राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत मार्गदर्शन केले जाते .
विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे सुजाण नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये बालपणी जर आपण पर्यावरण संवर्धन व प्रदूषण थांबविण्याचे मूल्य रुजविले तर भविष्यात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणासाठी हे फार मोठे समाजहिताचे , देशहिताचे कार्य घडेल .तसेच आपल्या भावी पिढीला आनंदाने प्रदूषणमुक्त जीवन जगता येईल .चला तर मग आपण शिक्षणातून पर्यावरण करू , प्रदूषण टाळू आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेवू या .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा