मुख्य सामग्रीवर वगळा

माणसांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान

माणसांचे प्राण वाचविण्यासाठी  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान 


आपण अनेक प्रकारचे दान करत असतो . या विविध प्रकारच्या दानातून आपल्याला एक सामाजिक कार्य केल्याचे आत्मिक समाधान मिळते . परंतु या सर्व दानांपैकी एक अनमोल दान म्हणजे रक्तदान .रक्तदान का करायचे ?रक्तदान केल्यामुळे काय होते ?या प्रश्नांचा आपण कधी विचार केला का? रक्तदान करणे हे खूप महत्वाचे दान आहे.
. रक्तदान केल्यामुळे अनेक माणसांचे प्राण वाचतात म्हणून रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान  असे म्हणतात . जागतिक रक्तदान दिन  १४ जून गेल्यानंतर या दिवसाचा विचार करायचा नाही का ? याचा आपण विचार केला पाहिजे .रक्तदान हे त्या दिवासापुरते मर्यादित नसून वर्षभर आपण रक्तदान करणे महत्वाचे आहे.आपण पाहतो
समाजामध्ये  अनेक व्यक्तींना अनेक कारणांमुळे रक्ताची अत्यंत गरज भासते .कधी अपघात ,रक्तश्राव ,प्रसवकाळ ,शस्रक्रिया ,कुपोषण ,,,,अशा अनेक प्रसंगी रक्ताची गरज भासते . त्यावेळी आपल्याला रक्तदानाची किंमत समजते .आज जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले .अनेक शोध लागले परंतु कृत्रिमरीत्या रक्त तयार करण्याचा शोध लागलेला नाही किंवा कृत्रिमरीत्या रक्त एखाद्या ठिकाणी  तयार केले जात नाही .तसेच बाजारात   किंवा एखाद्या  दुकानात रक्त विकत मिळत नाही   .आपण जर एकमेकांना रक्तदान केले नसते तर माणसांचे प्राण वाचले असते का ? म्हणूनच या  रक्तदानाला खूप महत्व आहे . रक्तदान चळवळ वाढण्यासाठी समाजात अनेक स्वयंसेवी संस्था व अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत .अशा  अनेक संस्थांच्या वतीने अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित केल्याचे आपण पाहतो .रक्तदानास हातभार लावण्यासाठी अनेक रक्तपेढ्या कार्य करत आहेत हे आपण पाहतो . आपल्याला रक्तदानाची खरी किंमत आपण  ज्यावेळी दवाखान्यात जातो  त्यावेळी डॉक्टर आपल्याला रक्ताची गरज लागेल असे म्हणून रक्त आणायला सांगतात .मग आपली रक्त शोधण्यासाठी रक्त आणण्यासाठी  खूप धावपळ होते मग आपल्याला रक्तदानाचे महत्व खऱ्या अर्थाने समजते .जोपर्यंत रक्त मिळत नाही तोपर्यंत आपण खूप चिंताक्रांत असतो .रक्त कोठे मिळेल ? कोण आपल्याला मदत करील ? रक्त वेळेत मिळेल का ? रुग्णाचे प्राण वाचतील का ?असे अनेक प्रश्न आपल्या मनात सारखे येत असतात .त्यावेळी आपण खूप बेचैन असतो कारण त्या रक्तगटाचे रक्त मिळवणे हे सतत आपल्या मनात असते .म्हणून अनेक संस्था जरी रक्तदानाचे कार्य करीत असल्या तरी आपण स्वतः रक्तदान शिबिर किंवा रक्तदान घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन  प्रयत्न करणे गरजेचे आहे . आज आपण पाहतो रक्तदान कमी प्रमाणात आहे ते प्रमाण वाढणे खूप  गरजेचे आहे. म्हणून आपण समाजात  रक्तदानाबाबत वेळोवेळी  जनजागृती केली पाहिजे . रक्तदान कोण करू शकतो हे आपल्याला माहीत असले पाहिजे . त्यामुळे रक्तदानाबाबत आपण समाजात वेळोवेळी सहजपणे लोकजागृती करू शकतो .रक्तदान करणारी व्यक्ती ही निरोगी असावी लागते .रक्तदान करण्यापूर्वी त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करावी लागते .विविध प्रकारचे गंभीर आजार असणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही .रक्तदान केल्याने रक्त पुन्हा वाढू लागते हे आपण रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला समजावून दिले पाहिजे  .रक्तदान करताना किंवा रक्तदान केल्यावर रक्तदात्याला कोणताही त्रास होत नाही याबाबत आपण लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे .रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला क्षयरोग ,मलेरिया ,मधुमेह ,हिपॅटा यटीस ,कॅन्सर ,एड्स ,,,असे आजार नसावेत .
रक्तदान करणारी व्यक्ती निर्व्यसनी असावी .रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वय सुमारे १८ वर्ष ते ६० वर्ष असावे लागते .रक्तदात्याचे वजन सुमारे ४८   किलो पेक्षा जास्त असावे लागते .रक्तदात्याची वर्षभरात कोणतीही शस्रक्रिया झालेली नसावी .
 रक्तदात्याने तीन महिने आधी रक्तदान केलेले नसावे .उपाशीपोटी खाऊन झाल्यावर अर्ध्या तासांपर्यंत रक्तदान करू नये .तसेच रक्तदात्याची इतर आजाराची तपासणी केली जाते.या सर्व बाबीची आपणास माहिती असणे खूप गरजेचे आहे  .रक्तदानासाठी पाचे ते दहा मिनिटे लागतात .रक्त आपल्या शरीरात संतुलन राखण्याचे महत्वाचे कार्य करते .जर शरीरातील रक्त कमी झाले तर ते आपल्या शरीराला  घातक असते .रक्त कमी झाल्याने अशक्तपणा येतो , थकवा जाणवतो ,दम लागतो .म्हणून आपल्या शरीरात रक्ताचे योग्य प्रमाण राहण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे . डायबिटीस आजार हा रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे होतो .म्हणून त्याबाबत खुप दक्षता घ्यावी लागते. डायबिटीस असलेल्या व्यक्तीने चालण्याचा सराव करणे आणखी फायद्याचे असते . तंदुरुस्त असलेली व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते . रक्त ए. बी.ओ.एबी .असे चार प्रकारचे  असते.रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी अनेक घरगुती उपाय अनेकांनी सांगितले  आहेत.रक्त वाढण्यासाठी मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे .बिट खाल्ल्याने रक्त वाढते .गूळ व शेंगदाणे खाल्ल्याने रक्त वाढते . एक ग्लास सफरचंदचा ज्यूस घेतल्याने रक्त वाढते.टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे रक्त वाढते .त्यामुळे आपल्या शरीरात रक्तचे योग्य प्रमाण राहण्यासाठी व आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण वेळोवेळी आरोग्याचे नियम पाळले पाहिजेत .आपण जर रक्तदानासाठी प्रयत्न केले तर आपल्याला ज्यावेळी रक्त लागेल त्यावेळी अडचण येणार नाही .रक्तदान ही काळाची गरज आहे.चला तर मग मानवता  जपण्यासाठी व माणसांचे  प्राण वाचवण्यासाठी रक्तदानाबाबत जनजागृती करून रक्तदान करू व रक्तदान वेळोवेळी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू.

लेखक 
तुकाराम तुळशिराम अडसूळ
    उपक्रमशील प्राथमिक शिक्षक 
    अहमदनगर
मो.७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏