ग्रंथालयाचा ध्यास धरी ,वाचन संस्कृती विकसित करी.
----------------------------------------
आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना आनंदाने यशस्वी जीवन जगायचे असेल तर वाचनाचा छंद प्राथमिक शिक्षणात जोपासला गेला पाहिजे .वाचनाने समाजात वावरण्याचे ज्ञान मिळते.वाचनाने विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते.आपण कधीही एकटे नाही, पुस्तके आपले मित्र आहेत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये तयार होणे महत्त्वाचे होते. वाचनाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.संस्काराची शिदोरी वाचनाने मिळते.
उदा-श्यामची आई ही कादंबरी वाचल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात. ही कादंबरी वाचताना विद्यार्थी तसेच इतर व्यक्ती भावनिक होतात.
विविध मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली जातात.अशा
विविध प्रकारच्या बोधकथा वाचनाने विद्यार्थ्यांना जीवनातील व्यवहारज्ञान समजते.तसेच जीवनातील ताणतणाव कमी होऊन विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित होते.विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते.नवनवीन गोष्टी शिकायला मिळून जीवनाला एक नवी दिशा मिळते.वाचनाने वाचकांचे आयुष्य बदलू शकते. आपल्याला जीवनाचे ध्येय गाठता येते एवढे सामर्थ्य वाचनात असते.वाचनाने माणसाची , देशाची ,जगाची प्रगती होते.जगात वाचन संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे.वाचनामुळे आपले अनुभवविश्व आणि भावविश्व वाढते. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनते.वाचनातून उद्याचे लेखक ,कवी ,साहित्यिक निर्माण होतात.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन कमी होत आहे .म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढणे महत्वाचे आहे.वाचनाने माणसाची प्रगती होते. विद्यार्थी हे आपल्या देशाची खरी संपत्ती आहे.त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. उद्याचे देशाचे सुजान नागरिक निर्माण होऊन त्यांचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजने अतिशय महत्वाचे होते.म्हणून ग्रंथालयाचा ध्यास धरी वाचन संस्कृती विकसित करी हा उपक्रम मी यशस्वीपणे राबविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.
लोकसहभागातून शाळेचे ग्रंथालय समृद्ध झाले.विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवणूक झाली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली.यासाठी विविध विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ यांचेशी या वाचन उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली होती.आपल्या जीवनाचा विकास होण्यासाठी जीवनात वाचन किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.म्हणूनच वाचाल तर वाचाल असे आपण का म्हणतो हे त्यांना समजावून दिले. त्यांना यापूर्वी वाचनाची आवड नव्हती.त्यांच्या आवडी निवडीचा विचार करून हा उपक्रम शाळेत आठवड्यातून एकदा उत्कृष्टपणे राबविला तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीतही यशस्वीपणे राबविला .त्यामुळे त्यांनी या वाचन उपक्रमासाठी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी त्यांच्या आवडी निवडीनुसार चर्चा केली.तुम्हाला चित्रे आवडतात का ? तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची चित्रे आवडतात? तुम्हाला गीते आवडतात का?तुम्हाला कोणकोणती गीते आवडतात?तुम्हाला गोष्टी आवडतात का?तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात? याबाबत त्यांच्याशी मुक्तपणे, आनंदाने संवाद साधून चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आम्हाला अनेक चित्रे ,गाणी ,गोष्टीची पुस्तके आवडतात हे अतिशय आनंदाने सांगितले.त्यासाठी त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देऊन त्यानुसार पुस्तकांची निवड केली.यामध्ये प्रथम प्राणी ,पक्षी यांविषयीची पूरक वाचनाची चित्रमय पुस्तके आणली.विद्यार्थ्यांना ही चित्रमय पुस्तके पाहून आवडू लागली. विविध प्रकारची चित्रे पाहून त्यांना या पुस्तकांचे आकर्षण वाटू लागले.त्यांनी आनंदाने ही पुस्तके पाहिली. या पुस्तकात चित्राखाली जाड टाईप मध्ये थोडा मजकूर होता.चित्रे पाहून विद्यार्थी या चित्राखाली असणारा मजकूरही वाचू लागले.या चित्रांबाबत त्यांच्याशी आनंदाने चर्चा केली.त्यांनी या चित्राबाबत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांनी या चित्रांबाबत स्वतःच्या शब्दात थोडक्यात माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती आनंदाने स्वीकारून त्यांचे वेळोवेळी अभिनंदन करून वाचनासाठी प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह आणखी वृद्धिंगत केला.त्यांना घरी वाचनासाठी आठवड्यातून एकदा पुस्तके दिली.यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची लहान लहान चित्रमय गोष्टींची पुस्तके पूरक वाचनासाठी दिली. विद्यार्थ्यांना गोष्टी नेहमी आवडत असतात.या पुस्तकाचे आठवड्यातून एकदा प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी शाळेत व घरी पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकांचे वाचन केले .वाचन केलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली .त्यांनी या पुस्तकात असलेली माहिती सारांश रूपाने आनंदाने स्वतःच्या शब्दात सांगितली.त्यांचे वेळोवेळी कौतूक करून त्यांना वाचनासाठी आणखी प्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. शाळेतून विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेली पुस्तके देवघेव बाबत आणि लोकसहभागातून मिळालेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांच्या शाळेत स्वतंत्रपणे सविस्तर नोंदी ठेवल्या . विद्यार्थी अवांतर वाचनासाठी आनंदाने पुस्तके घेऊन वाचू लागले.त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.पूरक वाचनाकडून विद्यार्थी वाचनाकडे वळू लागले.पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या पुस्तकाची वाट पाहू लागले.त्यांना वेळोवेळी वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके दिली.त्यांनी ही सर्व पुस्तके आनंदाने वाचली.हा उपक्रम शाळेत आठवड्यातून एकदा राबविला जातो.तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्या घरीही विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.विद्यार्थी आनंदाने वाचन करतात.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली आहे.या उपक्रमाचे महत्व ग्रामस्थांना समजले त्यांनी आमच्या शाळेस ग्रंथालयात विद्यार्थ्याना अवांतर वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि शाळेचे ग्रंथालय समृद्ध झाले.हा उपक्रम निरंतर राबविला जातो.
लेखिका
श्रीमती संजना भगवंत चेमटे
उपध्यापिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर
ता.नगर जि.अहिल्यानगर
मो.9881693382
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा