मुख्य सामग्रीवर वगळा

पर्यावरण संवर्धन काळाची गरज

पर्यावरण संवर्धन काळाची गरज 


  ५ जून  हा  जागतिक पर्यावरण  दिन. 
 हा दिन संपूर्ण जगभर  साजरा केला जातो. पर्यावरण हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो .त्याविषयी वृत्तपत्रातून अनेकवेळा वाचतो तसेच त्याविषयी अनेक पर्यावरण अभ्यासकांची अनेक   पुस्तके देखील प्रसिद्ध झाली आहेत .
पर्यावरण म्हणजे काय ते आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे कारण पर्यावरण आणि सजीव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .सजीवांच्या जगण्यासाठी पर्यावरण खूप महत्वाचे आहे म्हणून पर्यावरणाविषयी आपणास काहीतरी थोडी का होईना  माहिती असणे खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे आपल्याला पर्यावरण संवर्धन कार्य करण्याची एक दिशा मिळते.पर्यावरणात आपल्या सभोवताली असलेल्या सर्व जैविक व अजैविक  घटकांचा समावेश होतो .पर्यावरण हा शब्द जरी लहान असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे .थोडक्यात पर्यावरण संवर्धन म्हणजे सजीवांच्या जगण्यासाठी सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असणे .या पृथ्वीवर मानवासह सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे .अनेक सजीव मानवास प्रत्यक्ष उपयुक्त आहेत .तरी काही सजीव आपणास उपयुक्त नाहीत म्हणून त्यांचा आपण एवढा विचार करत नाही परंतु पर्यावरण संवर्धनाच्या  साखळीमध्ये प्रत्येक सजीव पर्यावरण संवर्धनाचे महत्वाचे कार्य करतो .म्हणून प्रत्येक सजीवांचे वेगळे महत्व आहे.सर्व सजीवांचे रक्षण आपण केले पाहिजे .फक्त आपल्या जगण्यास सभोवतालची परिस्थिती अनुकूल असून चालणार नाही तर आपण सर्व सजीवांच्या जीविताचा विचार करून त्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .
 हवा,पाणी ,अन्न या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.त्यांचे प्रदूषण आज वाढत आहे .त्यामुळे मानवसह सर्व सजीवांच्या जीवनास बाधा निर्माण होत आहे .म्हणून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण  ही एक फार मोठी जागतिक समस्या निर्माण झाली आहे .म्हणून पर्यावरण संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी मानून त्यासाठी हातभार लावला पाहिजे . शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारणाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येते ते आपण रुजवून तसे पर्यावरणप्रेमी नागरिक बनवू या .तसे दैनंदिन जीवनात आणि शिक्षणात आपल्या सर्वांच्या हातून नकळत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर घडत असतात .
साधे स्वच्छतेचे उदाहरण घ्या .जेथे स्वच्छता तेथे प्रसन्नता .तेथे आरोग्यसंपन्न जीवन .तेथे कोणतीही रोगराई नसते हे आपल्या कृतीतून संत गाडगेबाबा यांनी दाखवून दिले म्हणजे संत गाडगेबाबा पर्यावरणप्रेमी होते हे त्यांच्या महान कार्यातून सर्वांना माहीत आहे .छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिरवी झाडे तोडण्यास बंदी घातली होती जर एखादे झाड वाळून गेले असेल तर ते तोडण्यास परवानगी होती म्हणजे त्याकाळात त्यांनी स्वराज्य निर्माण करताना पर्यावरण संवर्धनाचे महान त्यांनी कार्य केले .
अत्यंत पुरातन काळातील भगीरथ राजाचे उदाहरण आपणास देता येईल .त्याकाळी त्यांनी हिमालय पर्वतावर प्रचंड प्रमाणात झाडे लावून त्यांचे संगोपन केले म्हणजे पर्यावरण संवर्धन केले  .अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी पर्यावरणासाठी आपले योगदान दिले आहे.
हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण का होते हे आपणास माहिती आहे ,
त्यांचे प्रदूषण होणार नाही यासाठी आपण  सर्वांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी व आरोग्यदायी जीवन मिळण्यासाठी प्रयत्न करू या .
म्हणून हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे .झाडापासून आपल्याला अनेक उपयोग होतात परंतु सर्वात महत्वाचे झाडापासून आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन मिळतो .म्हणून या हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे केले पाहिजे .वाहनांचा वापर मर्यादित केला पाहिजे .
पर्यावरण संवर्धनासाठी अनेक लहानमोठी माणसे अविरतपणे कार्य करत आहेत .याची अनेक उदाहरणे देता येतील .
स्वीडनची ग्रेटा थनबर्गचे उदाहरण देता येईल.
 १५-१६ वर्षांची शाळकरी मुलगी स्वीडन सारख्या खूप छोट्या देशात राहणारी मुलगी! जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची होणारी हानी  याबाबत तिने अभ्यासक्रमात अभ्यास केला .अभ्यासक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी जे सुचवले त्याप्रमाणे कार्यवाही होत नाही .म्हणून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी  तिच्या देशाच्या संसदे समोर जाते आणि एकटीच आंदोलन सुरु करते. आणि एक एक करून अनेक लोक तिला सामील होतात. पण त्या छोट्याश्या मुलीने दाखवून दिले की प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही मोठे काम छोटे लोक सुद्धा करू शकतात.
ग्रेटाने एवढ्या लहान वयात संपूर्ण जगात आपल्या पर्यावरण संवर्धन  कार्याचा आदर्श निर्माण केला .आज संपूर्ण जग  तिच्याकडे मोठ्या अभिमानाने  पर्यावरण कार्याबद्दल पहात आहे आणि तिच्या कार्याची प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धन करत आहेत.
आणखी एक उदाहरण, *वंगारी मथाई!* आफ्रिकेतील एक  महिला! विचार करते आणि निश्चय करून वृक्षारोपण करण्याचा संकल्प करते आणि आपल्या देशात कोट्यावधी झाडे फक्त लावतच नाही तर त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करते आणि तिचा आदर्श घेऊन पूर्ण आफ्रिकेत वृक्षारोपणाची फार मोठी एक सामाजिक चळवळ उभी करते.  पुढे जाऊन  तिला जगातील महान  नोबेल पारितोषिक सुद्धा मिळते. तिच्या मृत्युनंतर देखील ही  पर्यावरणाची चळवळ आज देखील  त्या देशात चालू आहे.

आणखी एक  उदाहरण, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष *अल गोर,* तसे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व पण जागतिक पर्यावरणाला पोहोचत असलेला धोका पाहून राजकारणातून संन्यास घेतात आणि पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची  जागतिक चळवळ उभी करण्यासाठी आपले आयुष्य वाहून देतात. ते काम करत असलेल्या ‘आयपीसीसी’ या संस्थेस देखील जगातील महान  नोबेल पुरस्कार मिळतो.
असे खूप  महान व्यक्तिमत्त्व  आहेत.ते  पर्यावरणात येऊन समाजासाठी ,देशासाठी  पर्यावरण संवर्धनाचे व प्रदूषण निवारणाचे महान  कार्य अविरतपणे करत आहेत .

आणखी सध्याचे उदाहरण देता येईल , अहमदनगर जिल्ह्यातील पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी आदर्श गाव  राळेगण सिद्धी   व पद्मश्री पोपटराव पवार यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथे पर्यावरण संवर्धनाचे महान कार्य करून  जगात आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला आहे .जगातील अनेक लोक आज पर्यावरणाचे कार्य पाहण्यासाठी या गावांना भेटी देतात .  म्हणून 
आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे संवर्धन होण्यासाठी 
आज आपण सर्वजण जागतिक पर्यावरण दिनापासून  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून प्रतिवर्षी किमान एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करू  असा संकल्प करू या.तसेच पाणी प्रदूषण थांविण्यासाठी नदीच्या किंवा इतर पाण्यात सांडपाणी ,गटारीचे पाणी सोडू नये त्याऐवजी शोषखड्डे घेणे .तसेच्या नदीच्या किंवा इतर पाण्यात जनावरे ,कपडे ,वाहने धुवू नये ,कचरा टाकू नये .नदीचा उगम होतो तेथे नदी स्वच्छ असते परंतु माणसांच्या वस्तीत आल्यावर ती दूषित होते याला आपण माणसे कारणीभूत आहोत .आपण नदीला माय म्हणतो आणि तिला दूषित करून  रोगराईला निमंत्रण देतो .म्हणून आपण नदी व इतर ठिकाणचे पाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करू या .
तसेच अन्नाचे प्रदूषण थांबविण्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व लोकांना पटवून दिले पाहिजे .भलेही उत्पन्न कमी येईल परंतु त्यामुळे होणारे आजारापासून मानवाची सुटका होईल त्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे .म्हणून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी  स्वतः पासून सुरुवात करू या म्हणजे आपल्याला , आपल्या मुलांना व आपल्या  पुढच्या पिढीला आरोग्यसंपन्न जीवन मिळेल .


तुकाराम  तुळशीराम अडसूळ 
मुख्याध्यापक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
मो-७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏