शिक्षकाच्या उत्कृष्ट कार्याची माहिती
शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम राबवून शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करून शिक्षणाला पूरक आनंददायी असे निसर्गरम्य वातावरण तयार केले .विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.विद्यार्थी वेळोवेळी घर व शेताच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात .विद्यार्थी व पालक प्रदूषमुक्त सणसमारंभ साजरे करतात.शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला.
लोकसहभागातून शाळेत विद्यार्थ्यांसाठी एल.ई. डी ,लेझीम ,लाऊड स्पीकर ,पाण्याची मोटार /पंप ,मैदानावर सिमेंट बेंचेस ,विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन अशा विविध वस्तू मिळवून विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या.लोकसहभागातून शाळेची किरकोळ दुरुस्ती ,स्वच्छतागृह दुरुस्ती , हॅन्डवॉश स्टेशन ,रंगकाम व सुंदर चित्रकाम करून शाळा आकर्षक
केली.त्यामुळे शाळा सुटली तरी विद्यार्थ्यांना घरी जाऊ वाटत नाही.अशी शाळा तयार केली.
विविध ऑनलाईन /ऑफलाईन स्पर्धेत विद्यार्थी नेहमी कृतिशील सहभाग घेऊन यश मिळवितात. जिल्हा , राज्य ,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेची विद्यार्थी पट संख्या वाढली. ३० विद्यार्थी पट असणारी शाळा ४२ विद्यार्थी पटावर गेली.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काही विद्यार्थी प्रवेशित झाले.
राज्याचे शिक्षण सहसंचालक यांच्या उपस्थितीत शाळा माजी विद्यार्थी मेळावा , वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांना विविध झाडांची रोपे वाटप ,विद्यार्थ्यांना लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य वाटप ,विद्यार्थ्यांना फराळ वाटप उपक्रमाचे आयोजन केले.या उपक्रमास ७५ टक्के गाव उपस्थित होते.हा एक इतिहास झाला.
त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी करून कार्याचे विशेष अभिनंदन केले.
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे म्हणून राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजनासाठी परिश्रम घेऊन पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतात.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी
गुगल मिट अँपवर सन २०२० /२१ व सन २०२१/ /२२ मध्ये उत्कृष्टपणे ऑनलाईन अध्यापन केले आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या गृहभेटी देऊन उत्कृष्टपणे वैयक्तिक मार्गदर्शन केले.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी करून १०० टक्के विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडवून घेतले.
कोरोनाकाळात सन २०२०/२१ व सन २०२१/२२ मध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्टपणे चालू रहावे म्हणून
विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्यायपुस्तिकेचे वाटप करून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून स्वाध्यायपुस्तिका सोडवून घेतल्या
शिक्षणासाठी गरीब कुटुंबातील चार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना विविध शैक्षणिक व इतर साहित्य वाटप केले.
आई वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून विविध शैक्षणिक साहित्य मिळवून दिले .अशा विद्यार्थ्यांना स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन वेळोवेळी मदत करतात.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा शिकू आनंदे उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन बाबत शासनाच्या SCERT च्या वतीने ३ जुलै २०२१ रोजी कृतिशील पाठाचे सादरीकरण केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनायोद्धा म्हणून चेक पोस्ट वर दिवसरात्र काम केले.
कोरोनाकाळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात कोरोनाबाबत जनजागृती करून लोकांची आरोग्य तपासणी केली. कोरोनाबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.
कोरोनाकाळात पर्यावरण संवर्धनासाठी रोपे विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून वृक्षारोपण केले.
शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा शाळेत राबविलेला नवोपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला नवोपक्रम स्पर्धेत सादर केला .या नवोपक्रमाची उल्लेखनीय नवोपक्रम म्हणून निवड झाली.त्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी विविध योगासने व प्राणायाम बाबत ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन केले.
कोरोनाकाळात शिक्षकांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन योग प्राणायम शिबिर आयोजन केले.
महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास विभाग अहमदनगर आयोजित जानेवारी २०१९ मध्ये बचत गटाच्या जिल्हास्तरीय साई ज्योती प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
शाळेत सेंद्रिय परसबाग तयार करून सेंद्रिय शेतीचे महत्व समजावून दिले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केली
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी शाळेत शिक्षण संचालक यांचे हस्ते बालवाचनालया सुरू केले.तसेच कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम वर्षभ राबविला . विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
यामध्ये किशोर मासिक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला .शाळेतील दहा विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी स्वतः भरली आहे.
जानेवारी २०२० मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत विविध देशातील शिक्षकांपुढे इंग्रजी विषयावर सादरीकरण केले.त्याबाबद्दल या परिषदेत विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
शाळा स्वच्छता कृती आराखडा यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून जिल्हा स्तरावर जून २०२१ मध्ये निवड झाली आहे.त्याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे विविध विषयाचे साहित्य निर्मितीसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड जून २०२१ मध्ये झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी ,तेरा कोटी व तेहतीस कोटी वृक्षलागवड उपक्रमात कृतिशील सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाच्या वनीकरण विभागाच्या वतीने जिल्हा उपवनसंरक्षक यांनी तीन वर्ष विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव कार्याचा गौरव केला.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्याक्रम संशोधन मंडळास फेब्रुवारी २०२१ मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञानातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम सादर केला .
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने विज्ञानावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत विशेष उल्लेखनीय निबंध म्हणून निवड केली.त्याबाबत विशेष प्रमाणपत्र दिले.
कोरोनाकाळात जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय विविध ऑनलाईन प्रशिक्षणे यशस्वीपणे पूर्ण केली.
सी .सी.आर .टी.प्रशिक्षण नवी दिल्ली येथे डिसेंबर २०१९ मध्ये गुजरात ,महाराष्ट्र, कर्नाटक ,मिझोराम ,उत्तरप्रदेश ,अरुणाचल प्रदेश ,तामिळनाडू राज्यातील शिक्षकांना पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शन केले.
सन २०१६ मध्ये मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे शिक्षण हक्क कायदा प्रशिक्षणसाठी महाराष्ट्रातील पाच शिक्षकांमध्ये निवड झाली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा एप्रिल २०२१ पासून प्रत्येक शनिवारी राबवीत असलेल्या किशोर गोष्टी उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी केले.
विद्यार्थ्यांना जगाची ओळख व्हावी म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्स उपक्रम राबवून कॅनडातील उद्योजकांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला.
कोरोनाकाळात पाठ्यपुस्तकातील लेखकांशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम राबविला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा